Type Here to Get Search Results !

मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी ; केंद्रीय मंत्री नाईक यांच्याकडे समितीची मागणी

मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी ; केंद्रीय मंत्री नाईक यांच्याकडे समितीची मागणी

बेळगाव : पंतप्रधान नरेद्र मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी आणि मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा तसेच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत् करावेत, अशी मागणी बेळगाव व खानापूरुस्महाराष्ट्रएकीकरण समितीच्या कार्यकर्त्यानी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. 



खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांच्चासह बेळगाव येथील समितीच्या कार्यकर्यानी गोवा येथे नुकतीच केंद्रीय मंत्री नाईक यांची भेट घधेतली. यावेळी आबासाहेब दळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्त होणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि प्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत् करावेत, अशी मागणी केली. संमेलनाला बेळगाव सीमाभागातील महाराष्ट्रएकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यावेळी उमेश पाटील., सुहास हुद्दार, किरण हुद्दार, शेखर तलवार आदी उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या