उद्या सकाळी अभिवादन, दुपारी निवेदन, सायंकाळी कोल्हापुरात अभिवादन
बेळगाव ः संयुक्त महाराष्टासाठी बेळगाव येथे १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेले कंग्राळी गावचे सुपुत्र पेलवान मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांना अभिवादन प्रतिवर्षाप्रमाणेया वषीही करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता कंग्राळी खुर्द येथे हा अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्यांना अभिवादन झाल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे दुपारी ठीक तीन वाजता कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्राच्या याचिकेबद्दल व सीमाप्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
या निवेदनाच्या कार्यक्रमानंतर मराठा महासंघ यांच्या वतीने कोल्हापूरू येथील बिंदू चौकामधे हुतातम्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी या 'अभिवादन व नियोजित निवेदन देण्याच्या कार्यक्रमांमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यानी, युवा आघाडीच्या व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, मराठी भाषिकांनी, सीमावासीयांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्रएकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व चिटणीस एँड. एम. जी. पाटील यांनी केले आहे. .


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या